Nashik News: सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या बहुमानासह गावाला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले असून, सलग दुसऱ्या वर्षी ५० लाखांचा सन्मान मिळवणारी ही जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे..राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात हे अभियान राबवण्यात आले होते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित शाश्वत विकास कामांचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये हरित क्षेत्र वाढ, जलसंवर्धन, सौर ऊर्जेचा वापर, जैवविविधता आणि प्रामुख्याने लोकसहभाग या निकषांवर भोकणीने बाजी मारली..Majhi Vasundhara: ‘माझी वसुंधरा’मध्ये उमरी नगर परिषद प्रथम.मागील वर्षी भोकणीने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला होता. या यशाचा उत्साह मावळू न देता सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक उपक्रमांची गती कायम ठेवली. प्रशासकीय मार्गदर्शन आणि ग्रामस्थांची जिद्द यांच्या जोरावर गावाने यंदा विभागस्तरावर प्रथम क्रमांकाची झेप घेतली..या यशात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी अशोक गवारी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. ढवळे, डॉ. नीलेश भुजाळ तसेच पंचायत समितीच्या सर्व विभागांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामविकास अधिकारी योगेश रहाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका आणि समस्त भोकणी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश साध्य झाले..शासनाच्या नियमानुसार, मिळालेल्या ५० लाख रुपयांच्या बक्षीस निधीचा वापर गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हरित क्षेत्र वाढवणे, जलसंधारणाची कामे करणे आणि पर्यावरणपूरक विकासकामांसाठी केला जाणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे..Majhi Vasundhara Campaign: ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेमध्ये मान्याची वाडीची हॅटट्रिक.पिंपळगाव डुकरा, लासलगाव व येवल्याचे यशइगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीला नाशिक विभाग स्तरावर १,५०० लोकसंख्या गटात सर्वोत्तम कामगिरीसाठी पहिल्या क्रमांकाचे ५० लाखांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात निफाड तालुक्यातील लासलगाव ग्रामपंचायतीचा राज्यात ५ वा तर विभागात प्रथम क्रमांक आला असून ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. .पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येवला शहराने राज्य स्तरावर ६ तर नाशिक विभाग स्तरावर १ ला क्रमांक पटकावला असून येवला नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.