Monsoon Tourism Maharashtra: सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दाटलेली धुक्याची दुलई... रिमझिम बरसणाऱ्या सरी आणि हिरवाईने नटलेला परिसर... अशा निसर्गरम्य वातावरणाने भीमाशंकर सध्या न्हाऊन निघाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले हे तीर्थक्षेत्र आता घनदाट जंगल, ओसंडून वाहणारे धबधबे आणि समृद्ध जैवविविधतेमुळे पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरत आहे..भीमाशंकर अभयारण्याची खरी ओळख म्हणजे येथील समृद्ध जैवविविधता. उंचच उंच वृक्षांच्या गर्दीत महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ सहजपणे बागडताना दिसतो. लांब शेपटीसह एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेणारा शेकरू पाहणे पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो. यासोबतच हरीण, ससा, माकड, कोल्हा आणि विविध प्रकारच्या सापांचा येथे मुक्त संचार असतो..पहाटेच्या शांत वातावरणात कोकिळा, बुलबुल, सुतार आणि भारद्वाज यांसारख्या पक्ष्यांचा किलबिलाट जंगलाला जाग आणतो. पक्ष्यांची विविधता आणि वन्यजीवांची उपस्थिती येथील निरोगी पर्यावरणाचे द्योतक आहे. पावसाळ्यात धबधबे ओसंडून वाहू लागल्याने परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडते..Tourism Development Plan: पर्यटनाला चालना देण्यासाठी समन्वयाने काम करा : गौडा.भीमाशंकरमध्ये निसर्ग पर्यटनाला मोठा वाव आहे. निसर्गप्रेमी, अभ्यासक आणि पर्यटक वर्षभर या परिसराला भेट देतात. पावसाळ्यानंतर फुलांच्या रंगांनी सजलेला सह्याद्री डोळ्यांचे पारणे फेडतो. कण्हेर, करंजी, पळस आणि जाई यांसारखी फुले जंगलाचे सौंदर्य वाढवतानाच फुलपाखरे, मधमाशा आणि इतर कीटकांसाठी जीवनाचा आधार ठरतात..वाढत्या पर्यटनामुळे या परिसरासमोर काही आव्हानेही उभी राहिली आहेत. त्यामुळे पर्यटकांनी ‘जंगल आपले नाही, आपण जंगलाचे आहोत’ ही भावना मनात ठेवून निसर्गाचा आदर करणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजात संगीत लावणे, प्लॅस्टिकचा कचरा टाकणे आणि वन्यप्राण्यांना त्रास देणे टाळावे. स्थानिक युवकांना पर्यावरणपूरक पर्यटनातून रोजगार उपलब्ध करून दिल्यास आर्थिक विकासासोबतच निसर्गसंवर्धनालाही चालना मिळू शकते..Eco Tourism : ‘इको-टुरिझम संवर्धन विकास आराखडा’.आरोग्याचा खजिना, औषधी वनस्पती भीमाशंकरच्या जंगलात हिरडा, बेहडा, अडुळसा, गुळवेल, शतावरी आणि अनंतमूळ यांसारख्या अनेक औषधी वनस्पती आढळतात. स्थानिक लोक आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे या वनस्पतींचा वापर पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. या ज्ञानाचे जतन आणि शास्त्रीय प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे..मातीचा स्वाद, रानभाज्यांची परंपरा पावसाळ्यात येथील जंगलात वाकडी, टाकळा, करटुले, शेवळे आणि कुरडू यांसारख्या अनेक रानभाज्या उगवतात. या भाज्या केवळ पौष्टिक नसून, त्या स्थानिक आदिवासी संस्कृती आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचे प्रतीक आहेत..दृष्टिक्षेपातभीमाशंकरच्या संवर्धनासाठी आवश्यक पावलेस्थानिक पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करणे.औषधी वनस्पती आणि रानभाज्यांच्या प्रजातींचे संरक्षण.कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे.पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगार देणे.वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप टाळणे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.