Irrigation Crisis: सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी पात्र कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. परिणामी पिके सुकू लागल्याने उजनी धरणातून तातडीने पाणी सोडण्याबाबत ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच पाणी सोडण्याची मागणी खा. प्रणिती शिंदे यांनी केली. .तालुका भीमा नदी पात्राची वाताहत आणि उजनीतून मोकळ्या रानात सोडलेल्या ऐन उन्हाळ्यात सोडलेल्या पाण्याबाबत सकाळने १२ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबतचे निवेदन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खा. शिंदे यांनी १३ एप्रिल रोजी देत गंभीर परिस्थितीची दखल घेण्याचे आवाहन केले..Water Management: पाणीटंचाईच्या त्रासातून यंदा मुक्ती.या निवेदनात म्हटले आहे की, उजनी धरणातून भीमा नदीत पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडले जात नसल्याने मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. .Water Management: आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाकडे वळणे गरजेचे.पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे ती जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय जनावरांसाठी लागणारे पाणी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे..जिल्हा परिषदनिवडणुकीच्या दरम्यान देखील पाणी सोडण्याबाबत प्रशासनाने चालढकल केली होती या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले. दरम्यान, काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष ॲड. राहुल घुले म्हणाले, सध्याच्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता व नदीकाठी पिके जतन करण्यासाठी धरण प्रशासनाने तातडीने पाणी सोडावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.