Beed News : माजलगाव तालुक्यात गेले दहा ते बारा दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिके अक्षरशः उध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील २८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. .त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. खासगी सावकार आणि बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामात खत, बियाणं, औषधे खरेदी करून मेहनतीने पिके उभी केली होती..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ऑगस्टमध्ये ९२ कोटी रुपयांचे नुकसान.मात्र, काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी यासारख्या पिकांवर पावसाचे पाणी साचून सर्व पीक मातीत गेले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.मुलांचे शिक्षण, लग्न, घरखर्च, आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड या सगळ्यांचा डोंगर त्यांच्या डोक्यावर कोसळलेला आहे. गेल्या १०–१२ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहेत. .या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५०,००० रुपये मदत व २५% अॅग्रीकल्चरल पिक विमा तत्काळ देण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे, अशी माहिती लढा दुष्काळाशी फाउंडेशन, बीडचे अध्यक्ष अॅड. राज पाटील यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.