Nashik News: स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर पुन्हा निर्बंध आणले आहेत. त्यानुसार घोजाडांगा परिसरातील हिली भू-बंदरातून भारतीय कांद्याच्या आयातीसाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून थांबवली आहे. मात्र त्यापूर्वी मंजूर केलेल्या परवान्यांतर्गत कांद्याची आयात ३० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे..मागील वर्षी फेब्रुवारीपासून बांगलादेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय कांद्याची निर्यात अस्थिर झाली होती. त्यानंतर बांगलादेश सरकारने देशांतर्गत दर स्थिर ठेवण्यासाठी व कांद्याच्या उपलब्धतेसाठी ऑगस्टमध्ये परवाने दिले; मात्र तेव्हा भारतातून अपेक्षित प्रमाणात निर्यात झाली नाही. गेल्या महिन्यात ७ डिसेंबरपासून पुन्हा मर्यादित प्रमाणात कांद्याचे आयात परवाने देण्यास सुरुवात केली..ऑगस्ट महिन्यापासून आत्तापर्यंत ज्या आयातदारांनी नोंदणी पूर्ण केली, त्यांना दररोज मर्यादित ५० आयात परवाने देण्यात येत होते. प्रत्येकी परवान्यास ३० टनांपर्यंत आयात मर्यादा घालण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात आयातीला परवानगी दिल्यानंतर आता पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत..बांगलादेशातील स्थानिक ‘मुरिकाटा’ या स्थानिक कांदा वाणाची आवक सुरू झाली आहे. त्याची स्थानिक बाजारात आवक वाढत आहे. आता आवक व उपलब्धतेची माहिती घेऊन स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयातीवर निर्बंध बांगलादेश सरकारने घातले आहे. यापूर्वी बांगलादेशने ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा, यासाठी आयात केली, तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयात थांबविली आहे..देशांतर्गत बाजारपेठेत कांदा दरावर दबाव वाढतानवीन आयात परवान्यांवर निर्बंध घातल्यामुळे भारताची बांगलादेशमधील निर्यात पुढील तीन आठवड्यांत पूर्णतः थांबेल. पूर्व आशियायी देशांतील मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर आणि आखाती देशांतील आयातदार मागणी नोंदवीत असतात. परंतु येथे पाकिस्तानमधील कांद्याचा स्पर्धात्मक दरात पुरवठा होत आहे. ज्यामुळे भारतीय निर्यातदारांनाही ग्राहक मिळविण्यासाठी कमी दराने कांदा निर्यात व पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निर्यात प्रत्यक्षात सुरू असली तरी थांबल्यासारखी व दरात कुठलाही फायदा नसणारी आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांदा दरावर दबाव वाढत आहे, असे कांदा व्यापारी व निर्यातदारांचे म्हणणे आहे..बांगलादेश सरकारने स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी कांदा आयातीवर निर्बंध लादले आहेत. पुरवठा सुरू असला तरी आता नवीन परवाने मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे निर्यातप्रक्रिया अस्थिर झाली आहे. –विकास सिंग, उपाध्यक्ष हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशन.कांद्याची आवक वाढली असली, तरी दरवर्षीच्या तुलनेत कमीच आहे. त्यातच बांगलादेशमध्ये निर्यात थांबल्याने कांद्याच्या दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे ज्या प्रतवारीच्या मालाची मागणी बांगलादेशमध्ये असते, त्या मालाचा पुरवठा तुलनेत कमी होईल. कांद्याचे दर व बाजारपेठ अस्थिर आहे. त्यामुळे व्यापार व निर्यातवाढीच्या अंगाने सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. – मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.