Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात मागील पाच महिने केळीदर दबावात आहेत. एका केळी झाडामागे सुमारे ५० ते ६० रुपयांचा तोटा शेतकरी सहन करीत आहेत. दुसरीकडे केळीला वादळ, गारपीट, अतिथंडी, करपा, कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही), अतिषउष्णता आदी समस्यांमुळेही दणका बसत आहे. .केळी उत्पादन मोठा तोटा सरत्या वर्षात सहन करीत आहेत. त्यांच्यासाठी केंद्र व राज्याने विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यंदाही वादळ, गारपीट, करपा, सीएमव्ही आदी समस्यांत केळीची हानी झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतनिधीची घोषणा, शाश्वत कार्यक्रम शासन, प्रशासनाने आणलेला नाही. शेतकरी आपल्या ताकदीने या समस्यांशी लढत आहेत. करपा निर्मूलन कार्यक्रम २०१४ पासून ठप्प आहे..Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्न प्रलंबित.विमा कंपनीची मनमानीवादळ व गारपिटीत हानी होते. पण शासन भरपाई देत नाही. विमा योजनेतून भरपाई देय असते. त्यातही तोकडा किंवा हेक्टरी १० ते १५ हजार रुपये निधी विमा कंपनी देते. विमा कंपनी सतत मनमानी करीत असल्याचा आरोपही आहे..Banana Cultivation: खानदेशात केळी लागवड बंदावस्थेत.केळी लागवडीत वाढकेळीची लागवड जळगाव जिल्ह्यात वाढली व क्षेत्र ७५ हजार हेक्टरवर पोचले आहे. केळी प्रमुख फळपीक आहे. पण केळीसाठी करपा निर्मूलन कार्यक्रम बंद झाला. यातून पूर्वी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा व मोफत मार्गदर्शन मिळत होते..हेक्टर चार हजार रुपये तरतूद होती. आता केळी उत्पादक केळी पिकापासून दूर जातील, असेही दिसते. कारण केळीवरील खर्च एका झाडासाठी १०० ते १२५ रुपये किंवा हजारी एक ते सव्वा लाख रुपये आहे. तर उत्पादन एका झाडापासून ५० रुपयेदेखील नाही. मोठा तोटा केळी उत्पादन कमी दरांमुळे मागील पाच महिने सहन करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.