Jalgaon News: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांना सदोष हवामानमापक यंत्र व हवामानाच्या चुकीच्या माहितीमुळे थंडी व अधिक तापमान यासंबंधीच्या नुकसान भरपाई किंवा परताव्यांपासून वंचित राहावे लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .जिल्ह्यात मागील कालावधीत सुमारे २२ नवी महसूल मंडले तयार झाली. या मंडलांत विमा कंपनी व कृषी विभागाने हवामानमापक यंत्रच बसविलेले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या भागातील विमाधारकांना परतावा कसा मिळेल, किती मिळेल याचा संभ्रम आहे..Crop Insurance: जानेवारीअखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा.हवामानमापक यंत्रांच्या आधारावरच ही योजना कार्यरत आहे. फळ पीकविमा योजनेत मागील हंगामात म्हणजेच २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले. यंदा सुमारे ९९ हजार शेतकऱ्यांनी एक लाख तीन हजार हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे. या योजनेची कार्यवाही हवामान म्हणजेच तापमान, वारा, गारपीट याबाबतच्या नोंदी, माहिती यानुसार विमा कंपनी करते. .केळी पिकाला कमी व अधिक तापमान, वेगाचा वारा आणि गारपीट या समस्यांबाबत विमा संरक्षण आहे. हवामानाची माहिती घेण्यासाठी हवामानमापक विविध महसूल मंडलांत कार्यरत करणे अनिवार्य आहे. एका खासगी कंपनीकडून हवामानमापक केंद्रांचे संचलन केले जाते. याच कंपनीकडून हवामानाची माहिती (डाटा) विमा कंपनी, शासन घेते व त्यानुसार परतावे देणे, नुकसान भरपाई देणे याची कार्यवाही केली जाते..Crop Insurance: पीकविमा अर्ज रद्द करण्याच्या कंपनीच्या निर्णयाला चाप.कानळदा, शिरसोली आदी मंडलांतील शेतकरी नाराज२०२४-२५ मध्ये नव्याने तयार झालेल्या जळगाव तालुक्यातील शिरसोली, कानळदा, चोपड्यातील आडगाव, रावेरातील केऱ्हाळे आदी महसूल मंडलांत हवामानमापक यंत्रच नव्हते. २२ महसूल मंडलांत ही समस्या जिल्ह्यात आहे. यामुळे या भागातील केळी विमाधारकांना चुकीच्या माहितीच्या आधारे परताव्यांपासून वंचित ठेवले जाऊ शकते, असाही दावा शेतकऱ्यांनी केला आहे..काही यंत्र सदोषजिल्ह्यात बसविलेले हवामानमापक केंद्र सदोष असल्याने अनेक महसूल मंडलांतील शेतकरी कम तापमान (थंडी) व अधिक तापमानासंबंधीच्या परताव्यांपासून वंचित राहतील, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील हंगामातही याबाबत तक्रारी आल्या होत्या. हवामानमापक केंद्रांकडून तपशील, माहिती (डाटा) घेऊन विमा नुकसानभरपाई देते ते हवामानमापक यंत्र कुठे आहे, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. अनेक भागात हवामानमापक केंद्रांची दैना झाली आहे. त्याभोवती वृक्ष, काटेरी झुडपे, आडोसा आहे. यामुळे तापमान, थंडी, वारा याच्या नेमक्या, अचूक नोंदी होत नाहीत. यामुळे अनेक केळीविमाधारकांना अधिक तापमानाच्या भरपाईपासून मागील वेळेस वंचित राहावे लागले होते. यंदाही यासंबंधी तक्रारी येत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.