Rain Crop Damage: सातपुड्याच्या पायथ्याशी सोमवारी (ता. १) सायंकाळपासून सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने आणि काही भागांत झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले. विशेषतः अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांमध्ये शेकडो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. काढणीसाठी तयार असलेल्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत..सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि काही वेळातच वादळी वाऱ्याने जोर धरला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने केळीच्या बागांमधील घड तुटून पडले. अनेक ठिकाणी पूर्ण झाडे कोसळल्याने बागा अक्षरशः आडव्या झाल्या. .Banana Crop Damage: जळगाव जिल्ह्यात वादळात केळीबागांचे नुकसान.काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात आली असून, सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे. वादळाचा सर्वाधिक फटका याच भागाला बसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. .Banana Crop Damage: वादळामुळे केळीचे पीक जमीनदोस्त.सहायक कृषी अधिकारी नुकसानग्रस्त शेतांमध्ये जाऊन पाहणी करणार असून, पंचनाम्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीज तारा तुटून विद्युत खांबही कोसळले..परिणामी मंगळवारी (ता. २) अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित होता. तळेगाव बाजार, गोर्धा, पचंगव्हाण, आकोली, काळेगाव, सिरसोली या भागांतील रस्तेही काही काळ बंद झाले होते. अनेक घरांवरील टिनपत्रे उडाल्याच्या घटनाही घडल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.