Jalgaon News : कृषी विभाग व विमा कंपनीच्या स्तरावर निधी वितरण, पात्र व अपात्र महसूल मंडळ यासंबंधीचा घोळ, विलंब झाला आहे. यामुळे जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी केळी उत्पादकांना अजूनही परतावे मिळालेले नाहीत. .२०२३-२४ पासून असाच प्रकार सुरू आहे. २०२४-२५ च्या हंगामात ७२ हजार केळी उत्पादक या योजनेत सहभागी झाले होते. अजूनही यातील पात्र शेतकरी, पात्र महसूल मंडळ, कुणाला किती परतावा मिळेल, याची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. फळ पीकविमा योजनेत शेतकरी ऑक्टोबर २०२४ मध्ये सहभागी झाले होते. .Banana Crop Insurance: केळी पीकविमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत.केळी पिकास या योजनेतून नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी विमा संरक्षण होते. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसात म्हणजेच १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत पात्र केळी विमाधारकांना परतावे मिळणे अपेक्षित होते. परंतु विमा परतावे मिळालेले नाहीत. कमी व अधिक तापमान आणि वादळ किंवा वेगाचा वारा आदी नुकसानीसंबंधी या योजनेतून केळी पिकास विमा संरक्षण आहे..Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य.हवामानाची माहिती प्राप्त होण्यास विलंब२०२२-२३ मध्ये या योजनेत मोठा घोळ झाला होता. या वर्षी सहा हजारांवर विमाधारकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते. यंदाही या योजनेसंबंधी एका खासगी कंपनीकडून कमी व अधिक तापमान, वेगाचा वारा आदींच्या महसूल मंडळनिहाय नोंदी घेण्यास कृषी विभागाने विलंब केला. .याच महिन्यात ही माहिती घेण्यात आली. यामुळेदेखील परताव्यांना विलंब होत आहे. तसेच केंद्राकडून निधीसाठीदेखील मागणी विलंबाने करण्यात आली. परतावे देण्यासाठी विमा कंपनीला लोकप्रतिनिधी, शेतकरी वारंवार सूचना देत आहेत. पण विमा कंपनी व कृषी विभागाने यंदाही मोठा घोळ केल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.