Jalgaon News: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून निर्देशित मुदतीत परतावा पात्र केळी पिकविमाधारकांना मिळालेला नाही. परताव्यांना मोठा विलंब होईल, असे दिसत आहे. यामुळे पुढे नियमानुसार १२ टक्के व्याजासह हा परतावा मिळावा, अशी मागणी विमाधारक करीत आहेत. .हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२४-२५ मध्ये सुमारे ७२ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे. या योजनेतून १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीसाठी केळी पिकास विमा संरक्षण होते. .Crop Insurance : अतिवृष्टीमुळे राज्यातील २५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान.हा विमा संरक्षण कालावधी नऊ महिन्यांचा आहे. हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसात म्हणजेच १५ सप्टेंबरपर्यंत पात्र विमाधारकांना परतावा मिळणे अपेक्षित होते. परंतु १५ सप्टेंबर २०२५ अखेरही पात्र केळीविमाधाकांना परतावे मिळालेले नाहीत. .Crop Insurance: सोयाबीन, मूग पेरणीच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र अधिक.केळीला मध्यंतरी किंवा उन्हाळ्यात ऊन, वादळी पावसाचा फटका बसला. आता दर कमी झाले. केळीसाठी मोठा खर्च रोपे, मजुरी, खते, तणनियंत्रण, ठिबक आदींसाठी येत आहे. कमी दर असल्याने केळी पीक तोट्यात आहे. या स्थितीत पात्र केळी विमाधारकांना तत्काळ विमा परतावा मिळणे अपेक्षित आहे. पण शासन यासंबंधी कार्यवाही करीत नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे. .पात्र कोण, अपात्र कोणया योजनेत किती व कोण शेतकरी पात्र आहेत, किती परतावे मिळतील, कुठल्या महसूल मंडळात कमी व अधिक तापमानासंबंधी परतावे दिले जातील, वादळात हानीसंबंधी किती केळी विमाधारकांना परतावे मिळतील, याची कोणतीही माहिती विमा कंपनी व कृषी विभाग जारी करीत नसल्याची स्थिती आहे. यामुळे विमाधारकांत संताप आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.