Palghar News: विक्रमगड तालुक्यात अवकाळी पावसाचा भातशेतीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे खरीप पीक वाया गेल्याने बांधावरील तुरीच्या पिकामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे..खरीप हंगामात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. सध्या पीक जोमाने आले असून, घरातील अन्नसुरक्षा तुरीमुळे टिकली आहे. कमी खर्च, रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असल्याने पोषक घटकांनी समृद्ध अशा तुरीच्या पिकाने दुर्गम भागातील शेतकऱ्यांना जीवनावश्यक ठरत आहे. .Tur Crop: बी.डी.एन. ७११ आणि गोदावरी वानामुळे तुरीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे .महत्त्वाचे म्हणजे, विक्रमगड तालुक्यातील बहुतांश शेतकरी अजूनही पारंपरिक भातशेतीवर अवलंबून आहेत. मात्र, उत्पादन खर्च जास्त आणि बाजारभाव कमी असल्याने उत्पन्न शाश्वत राहलेले नाही. अशा परिस्थितीत बांधावरील व खाचरातील तूर उत्पन्नाचे सुरक्षित साधन ठरत आहे..Tur Crop: तूर पिकातील वांझ रोगाचे व्यवस्थापन कसे करावे?.लागवडीचे फायदेकृषी विभाग व स्वयंसेवी संस्थांनी तूर, हरभरा, उडीद, कडूवालसारख्या कडधान्य पिकांना प्रोत्साहन दिल्याने तालुक्यात लागवड वाढली आहे. स्वतःच्या वापरासाठी डाळ उपलब्ध होते, शिवाय जादा उत्पादन विकून आर्थिक उत्पन्न मिळते. तुरीसाठी मोठी जमीन लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर किंवा खाचरात सहज लागवड करता येते..किलोला २५० ते ३०० चा भावगेल्या दोन-तीन वर्षांत तूरडाळीचे भाव प्रतिकिलो २५० ते ३०० रुपयांपर्यंत गेले आहेत. पुढील काळात भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. अशावेळी बांधावर उगवलेली तूर शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.