Agriculture Tips: मिरची पिकात अनावश्यक वाढवर्धकांचा वापर कटाक्षाने टाळण्याचा सल्ला हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिला..शिवना (ता. सिल्लोड) येथील शिवाई देवी संस्थानच्या सभागृहात सोमवारी (ता. २४) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘मिरची लागवड व्यवस्थापन’ विषयावर डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते. ‘सकाळ ॲग्रोवन’ व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..Successful Farming Tips: अनुभवातून शेतकऱ्यांनीच दिला शेतकऱ्यांना यशाचा मंत्र.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एचडीएफसी बँकेच्या सिल्लोड शाखेचे व्यवस्थापक सर्फराज सय्यद, तर प्रमुख अतिथी म्हणून उपकृषी अधिकारी गणेश सुरडकर, सहायक कृषी अधिकारी विनोद पवार आदी उपस्थित होते..डॉ. पाटील म्हणाले, की विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंध हाच प्रभावी मार्ग आहे. शेतकऱ्यांनी लागवडीसाठीची रोपे स्वतः तयार करावीत. त्यासाठी बियाण्याची निवड करताना निरोगी मिरची बियाणे निवडावे. तसेच रोपे निवडताना ती तजेलदार व उत्कृष्ट दर्जाची असावीत. रोपे घेताना ती मान्यताप्राप्त नर्सरीतूनच घ्यावीत. लागवडीसाठी बेड तयार करताना आधुनिक पद्धतीने बेडनिर्मिती करून सेंद्रिय घटकांचा प्राधान्याने वापर करावा. बेडमधील माती भुसभुशीत राहण्यासाठी रेती, माती, शेणखत व तणाचा भुसा समप्रमाणात वापरावा. लागवडीचे अंतर महत्त्वाचे असून, ४ बाय अडीच फूट अंतरावर लागवड केल्याने मिरची पिकात सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यास मदत होते..मिरची पिकात सापळा पिकांची लागवड करावी. त्यामुळे कीड व रोगांचे नियंत्रण करण्यास मदत होते. याशिवाय चोहोबाजूंनी शेडनेट लावल्यास कीड नियंत्रणास मदत होते. सिंचनासाठी वाफसा स्थितीत ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करणे योग्य आहे. मल्चिंग पेपरचा वापर, पिवळे व निळे सापळे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संतुलित खत नियोजन या बाबी मिरची पिकाचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले..Sustainable Agriculture : शाश्वत शेतीसाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगांची सांगड महत्त्वाची .एचडीएफसी बँकेचे सर्फराज सय्यद म्हणाले, की जगातील पहिल्या दहा बँकांमध्ये एचडीएफसी बँकेची गणना होते. शेतकऱ्यांना पीककर्ज, विविध साहित्य खरेदीसाठी कर्ज तसेच प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज बँकेकडून दिले जाते. आपले खाते व व्यवहार जपून करणे आवश्यक आहे. व्यवहार खात्याद्वारेच करावा आणि बँकेतील आपली पत चांगली ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला..उपकृषी अधिकारी गणेश सुरडकर व सहायक कृषी अधिकारी विनोद पवार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्यातील लाभाच्या योजना तसेच गटाने योजनांचा लाभ घेणे कसे फायदेशीर ठरते, याची माहिती दिली..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार संतोष मुंढे यांनी केले. आभार ‘सकाळ’चे तालुका बातमीदार सचिन चौबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘सकाळ’च्या वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक शिवाजी मोटे, वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे आणि शिवना येथील बातमीदार सुभाष होळकर यांनी विशेष परिश्रम घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.