Mumbai News: अतिवृष्टिग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज वितरणात ई-केवायसीची अडचण येत असून साडेसहा लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी न झाल्याने मदत वितरणात अडचणी आल्या आहेत. या शेतकऱ्यांची पुढील तीन दिवसांत ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २८) दिले. .मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टिग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील मदत वितरण थांबले असून अनेक ठिकाणी शेतकरी पात्र असूनही मदत मिळत नसल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी उपस्थित केला..PM Kisan: अपूर्ण केवायसीमुळे शेतकरी मदत रखडली.यावर मुख्य सचिवांकडे विचारणा केली असता अद्याप साडेसहा लाखांवर शेतकऱ्यांची ई- केवायसी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मदत मिळत नसेल तर तीन दिवसांत विशेष ड्राईव्ह घेऊन तातडीने ई-केवायसी करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश द्या असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले..मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील गेल्या दोन मंत्रिमंडळ बैठकींना गैरहजर होते. सध्या त्यांच्या मतदारसंघातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, म्हसवड या नगरपरिषदांची निवडणूक जोर धरू लागली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या नियोजनात ते गुंतले असल्याची चर्चा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.