Satara News: सणासुदीला, विविध उत्सवात सजावटीसाठी कृत्रिम प्लॅस्टिक फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेल्या फुलांना मागणी नसल्यामुळे मोठे नुकसान होत नाही. परिणामी कृत्रिम फुलांवर बंदी आणावी, अशी मागणी विधानसभेत अनेक आमदारांनी केली होती. .त्यावर या बाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी घोषणा फलोत्पादन मंत्री भारत गोगावले यांनी महिन्यांपूर्वी केली होती. मात्र सध्या गणेशोत्सवात राजरोसपणे कृत्रिम फुलांची विक्री सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे..Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदी आणून फुलशेतीला संरक्षण द्या.शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करून चार पैसे चांगले मिळावे यासाठी फुलपिके घेतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असते. परंतु बाजारात विकल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या पुलांनी त्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे..Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार.त्यामुळे शेतकरीही हवालदिल झाले आहेत. कृत्रिम फुलांवर बंद आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. याची दखल घेऊन आमदारांनीही विधानसभेत आवाज उठविला. मात्र सरकारकडून केवळ घोषणा करण्यात आली आहे..आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही निवेदन देऊन मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फलोत्पादनमंत्री गोगावले व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन आमदारांना दिले होते. कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याची सरकारकडून महिन्यांपूर्वी घोषणा होऊनही त्या संदर्भातील अध्यादेश अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.