Amravati News: तिवसा तालुक्यातील मारडा शेतशिवारात मुख्य कालव्याचे पाणी वऱ्हा, घोटा या पाणंद रस्त्यात तीन ते चार फूट साचल्याने शेतात जाण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. ज्यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. .तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या जलसंपदा विभागाच्या ऊर्ध्व वर्धा कालव्याची स्थिती अतिशय वाईट असून अनेक ठिकाणी मोठे भगदाड पडल्याचे चित्र पाहायला मिळते. .Canal Water Protest : पालखेडच्या पाण्यासाठी अर्धनग्न आंदोलन.कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पाण्याखाली आल्या आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे..Kolhapur Water Problem : कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये ७० टक्क्यांनी पाणी पातळी घटली, पाणी प्रश्न गंभीर.गेल्या कित्येक वर्षांपासून मारडा येथील पाणंद रस्त्यावरून कालव्याचे पाणी वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांना कंबरेवर पाण्यातून वाट काढावी लागते. .या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले, परंतु अजून परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.