Dharashiv News: यंदा दहा मेपासूनच पावसाला सुरवात झाली. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतील विविध कामे करण्यासाठी पुरेशी संधी व वेळच मिळाला नाही. तरीही जिल्ह्यात ५८ कामे करण्यात आली. ही २१ कामे अशासकीय संस्था व एक काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. .उर्वरित कामे संबंधित यंत्रणांनी केली. पावसाळ्याच्या तोंडावर केलेल्या या कामांबाबत संशय व्यक्त झाला. यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्व कामांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्रयस्थ अधिकाऱ्यांनी सर्व कामांना क्लिन चीट दिली असून एकाही कामात अनियमितता झाली नसल्याचा अहवाल दिला आहे..Water Conservation: बारव पुनर्शोध, संवर्धनातील ‘महाराष्ट्र बारव मोहीम’.यामुळे ५८ कामांसाठी राज्य सरकारकडून निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला तरी कामांबाबत काही समस्या किंवा तक्रार असल्यास तीन दिवसात लेखी स्वरुपात द्यावी, असे आवाहन प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे. धाराशिवच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाकडून दरवर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबण्यात येते. या योजनेतून दरवर्षी प्रकल्पांतील गाळ उपसा, तसेच नदी, नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे केली जातात..सरलेल्या आर्थिक वर्षात ५८ कामांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. यात जलसंपदा विभागाने केलेल्या २३ व जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाने केलेल्या ३५ कामांचा समावेश आहे. ही कामे २१ अशासकीय संस्था व १ ग्रामपंचायतीच्या मार्फत पूर्ण करण्यात आलेली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात ही कामे केली जातात. मात्र, यंदा १० मेपासूनच पावसाला सुरवात झाली. यामुळे मंजूर कामांना काम करण्यासाठी संधीच मिळाली नाही..Water Conservation: पालघर जिल्हा लवकरच जलसमृद्ध.सातत्याने अतिवृष्टीसारखा पाऊस पडत गेला. यामुळे खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना मशागतीची कामेही करता आली नाहीत. जिथे शेतकऱ्यांना शेतातील कामे करता आली नाहीत. तिथे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतील कामे कुठे आणि कशी झाली, असा प्रश्न निर्माण जाला. या परिस्थितीत जिल्ह्यात ५८ कामे करण्यात आल्याने संशय बळावला. यामुळेच निधी प्राप्त झालेल्या कामांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते..त्यानुसार सर्व ५८ कामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली असून कामांमध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असा अहवाल त्रयस्थ अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरीही कामांबाबत शेतकऱ्यांची तक्रार असेल, तर त्याची दखल घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळेच कामांबाबत कोणतीही समस्या असल्यास त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, धाराशिव यांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात समस्या व तक्रार द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.