Rural Development: अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या तीव्रतेसोबत जाणवणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत संभाव्य टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्ह्याच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. .या आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील २६२ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध ३१४ उपाययोजना राबवल्या जाणार असून, त्यासाठी ४ कोटी २७ लाख ४० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे..Water Scarcity: पाणी टंचाईसाठी जनजागृती व्हावी : काटकर.प्रशासनाने हा आराखडा दोन टप्प्यांत विभागला आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च दरम्यान १२ गावांसाठी १५ उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले होते. तर मुख्य टप्प्यात, म्हणजेच एप्रिल ते जून या सर्वाधिक उष्णतेच्या काळात, अडीचशे गावांमध्ये २९९ उपाययोजना राबवल्या जाणार आहेत..Water Scarcity Management: सोलापुरातील २४६ गावांतील पाणीटंचाईचे नियोजन.आराखड्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील बाधित गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात बार्शीटाकळी तालुक्यात ६७ गावे, पातूर ५६ गावे,मूर्तिजापूर ३९ गावे, अकोट ३३ गावे, तेल्हारा २८ गावे, बाळापूर २३ गावे, अकोला १६ गावांचा समावेश आहे..पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तांत्रिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे. यात १२७ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.