Akola Soybean Seed Germination Complaints: अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याप्रकरणी १० हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून, काही बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर तक्रारदार शेतकऱ्यांकडून ‘आमचे समाधान झाले आहे’ असे लेखी पत्र घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दोषी कंपन्यांना चौकशीतून वाचविण्याचा प्रयत्न केला जात नाही ना, असा गंभीर संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे..यंदाच्या खरिपात निकृष्ट उगवणक्षमतेच्या सोयाबीन बियाण्यांमुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली, तर काहींची शेती अद्यापही पेरणीअभावी पडून आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडे १० हजारांहून अधिक तक्रारी दाखल आहेत. तक्रारींच्या तपासणीनंतर काही संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत..Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार.दरम्यान, बियाण्यांची उगवण न झाल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे कृषी केंद्रचालकांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. ही माहिती कृषी विभागातून देण्यात आली की संबंधित बियाणे कंपन्यांकडून मिळाली, याबाबत स्पष्टता नाही. मात्र या यादीच्या आधारे कृषी केंद्रचालक तक्रारदार शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहेत. काही शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याची, तर काहींना बियाण्याच्या किमतीएवढे कृषी साहित्य देण्याची तयारी दर्शविली जात आहे..त्याचवेळी संबंधित शेतकऱ्यांकडून ‘आमचे समाधान झाले आहे’, असे लेखी पत्र घेतले जात असल्याचे समोर आले आहे. या पत्रात ‘कोणतीही तक्रार नसून तक्रार मागे घेण्यात यावी’, अशी विनंतीही शेतकऱ्यांकडून करण्यात आल्याचे नमूद केले जात असल्याने या प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे..Seed Germination: नांदेड जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत १७४ तक्रारी.अशा समाधानपत्रांचा वापर संबंधित कंपन्यांच्या बचावासाठी होण्याची शक्यता असून, त्यामुळे मूळ तक्रारींच्या चौकशीवर परिणाम होण्याची तसेच पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे, अशा पत्रांमुळे कोणत्याही कंपनीविरुद्धची चौकशी थांबविण्यात येणार नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे..शेतकऱ्यांकडून समाधान पत्र लिहून घेतली जात आहेत. हा प्रकार कंपन्यांना वाचविण्यासाठीच सुरू आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. ज्यांनी असे पत्र दिले, त्यांच्या पंचनाम्यांचे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. माझे आजही १० एकर शेत पेरणीअभावी पडून आहे.धनंजय डिगांबर गावंडे, शेतकरी, हिवरखेड, ता. तेल्हारा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.