Vidarbh Monsoon 2026: अकोला जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेती क्षेत्रासह ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला असला तरी जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ३२ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. .तेल्हारा तालुका वगळता जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक असून, दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत आहे. जिल्ह्यात जून ते शनिवारपर्यंत (ता. १८) सरासरी २८६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात केवळ १७८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ.शिवाय हजारो हेक्टर नापेर क्षेत्राचाही विषय येत्या काळात गंभीर होऊ शकतो. पेरणीनंतर पिकांना आवश्यक प्रमाणात ओलावा मिळत नसल्याने अनेक भागांतील शेतकरी चिंतेत आहेत. प्रामुख्याने अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर आणि पातूर तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत कमी आहे. या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ सुमारे ५५ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे पिकांची उगवण, वाढ आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे..सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना वेळेवर पावसाची गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. तालुकानिहाय पावसाची स्थिती पाहता अकोट तालुक्यात सरासरी २५४.३ मिलिमीटरच्या तुलनेत २३२.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तेल्हारा तालुक्यात सरासरी २४५.८ मिलिमीटरच्या तुलनेत २७९.७ मिलिमीटर म्हणजेच ११३.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तेल्हारा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तेथील परिस्थिती तुलनेने चांगली आहे..Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी.मात्र इतर तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे. बाळापूर तालुक्यात सरासरी २३८.४ मिलिमीटरच्या तुलनेत १३१.९ मिलिमीटर, पातूरमध्ये सरासरी ३११.८ च्या तुलनेत १६६.१ मिलिमीटर, अकोला तालुक्यात २६२.९ च्या तुलनेत १३२.५ मिलिमीटर, बार्शी टाकळीमध्ये २७६.५ च्या तुलनेत १५०.९ मिलिमीटर, तर मूर्तिजापूरमध्ये २७६.७ मिलिमीटरच्या तुलनेत १८८.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे..उत्पादनात घट होण्याची शक्यताकमी पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसत असून, पिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. पावसाचा खंड असाच कायम राहिल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय आठवडाभरापूर्वी झालेल्या क्षेत्रातील पेरण्याची उलटण्याचे संकट वाढत आहे. दुबार पेरणी करावी लागणार आहे. आधीच निकृष्ट सोयाबीन बियाण्याबाबत जिल्ह्यात दोन हजारांवर तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले असून, दमदार पावसाशिवाय खरीप हंगामाला कुठल्याही बाबीशिवाय आधार मिळण्याची शक्यता नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.