Agriculture Advisory Maharashtra: हवामानातील अनिश्चिततेमुळे अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याबरोबरच दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतरच भात पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. .कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतात किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा वाफसा तयार झाल्यानंतर भाताची टोकण किंवा विस्कटून पेरणी करावी..Paddy Cultivation: एरोबिक भात लागवड - कमी पाण्यात भात उत्पादनाचा पर्याय.अपुऱ्या पावसावर पेरणीनंतर पडणाऱ्या कडक उन्हामुळे अंकुर जळून जाण्याची शक्यता असते. बियाणे, खते, मजुरीवर झालेला खर्च वाया जाऊन दुबार पेरणी करावी लागू शकते..Paddy Nursery Crisis: भात रोपवाटिका संकटात; पावसाअभावी दुबार पेरणीची भीती.तसेच शेतकऱ्यांनी भातबियाणे, खतांची खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून करावी. खरेदीची पक्की पावती तसेच बियाण्यांचे पाकीट जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे..खबरदारी घ्याशेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिकेद्वारे खात्रीशीर सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनीच रोपवाटिका तयार करण्यास प्राधान्य द्यावे.हवामानातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पेरणी करावी, असे आवाहन केले आहे.