Smart Farming: ‘‘बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठे सक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून या आव्हानांवर मात करत शेतीला परिणामकारक दिशा देता येईल. त्यासाठी चारही कृषी विद्यापीठांमधील संशोधनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,’’ अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली..डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ५४ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या तीनदिवसीय बैठकीचे विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात उद्घाटन सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे भरणे बोलत होते..Self Reliant India: आत्मनिर्भर भारतासाठी शेती, शेतकरी केंद्रस्थानी : डॉ. शरद गडाख.या वेळी रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, माजी आमदार सूर्यकांत दळवी, विनायक काशिद, सुनील दळवी आदी उपस्थित होते..या वेळी ॲड. जयस्वाल म्हणाले, की यंदा कृषी विद्यापीठांच्या अंदाजपत्रकात १०० कोटी रुपयांनी वाढ केली आहे. विकसित महाराष्ट्राचा २०४७ चा ‘रोड मॅप’ तयार करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन समितीमार्फत विकासाचे नियोजन करणे गरजेचे आहे..Smart Farming : शेतीच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा.गोगावले म्हणाले, ‘‘फलोत्पादनात आपले राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून, कृषी विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकरी सक्षम होणार आहेत. ’’.प्रास्ताविक कुलगुरू डॉ. भावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले.