Chandrapur News: खरीप हंगामापासून एक रुपयात पीकविमा योजनेला मिळालेला पूर्णविराम आणि निकषांत झालेले बदल यांचा परिणाम पीकविमा योजनेवर झाला असून नागपूर विभागातील शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र समोर आले आहे..या खरीप हंगामात नागपूर विभागातून केवळ ७ लाख ७० हजार २५९ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. २०२४ मध्ये १५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेसाठी अर्ज केले होते. २०२३ राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली..Crop Insurance: पीकविमा परताव्यांवर १२ टक्के व्याज द्या.एक रुपया पीकविमा योजनेत प्रतिकूल हवामान घटकांमुळे पिकांची पेरणी, लावणी , उगवण न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या घटकांचा प्रामुख्याने समावेश होता. एक रुपयात पीकविमा असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात याला मोठा प्रतिसाद मिळाला. २०२३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तीन लाखांवर आणि २०२४ मध्ये अडीच लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला..या दोन्ही वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, नुकसानभरपाई देताना विमा कंपनीने हातचलाखी केली. वेगवेगळी कारणे समोर करत शेतकऱ्यांचा पीकविमा नाकारला होता. हा मुद्दा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उचलून धरला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला होता. .Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा क्षेत्रात यंदा ७५ टक्क्यांनी घट.मागील वर्षी मराठवाडा आणि अन्य भागांत पीकविमा योजनेत मोठा घोळ झाला. विधानसभेत हे प्रकरण चांगलेच गाजले. तेव्हापासूनच एक रुपयात पीकविमा योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. २०२५ च्या खरीप हंगामात राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना बंद केली. त्यात काही बदल करण्यात आले. खासकरून नव्या पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार होते. .नव्या पीकविमा योजनेत महत्त्वांचे निकष बदलविण्यात आले. त्याचा परिणाम पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पीकविमा योजनेला एक जुलैपासून सुरवात झाली. ३१ जुलै २०२५ ही विमा काढण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतरही पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. .मात्र, तरीही शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नव्हता. रब्बी हंगामातही प्रमाण तुटपुंजेच खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविली आहे. रब्बी हंगामात १४९६ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले. त्यापैकी १०१३ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढून पीक संरक्षित केले आहे. जिल्ह्यात ३ लाख ५१ हजार शेतकरी आहे.यंदा ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे पीकविम्याचे काम सोपविण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.