Crop Loss Update: गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे राज्यातील १ लाख ३० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर, गुरुवारी एका दिवसात ८ हजार ४६८ हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..मागील चार दिवसांपासून वाहणारे वादळी वारे, बरसणारा पाऊस आणि गारपीट यांचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. पूर्वमोसमी पाऊस आणि वादळाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याला बसला असून, एका दिवसात ३ हजार ३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे..Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी उपाययोजना.जळगावमध्ये २५४२ हेक्टर, धुळ्यात ११२६ हेक्टर, बुलढाण्यात १५७६ हेक्टर, जालन्यात ११० हेक्टर, नागपूरमध्ये ४१ हेक्टर, वाशिम २९ हेक्टर आणि अमरावतीत १२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे..Hailstorm Crop Damage: वादळ, गारपिटीने पीकहानी सुरूच.रब्बी पिकांचे नुकसानरब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे केळी, आंबा, डाळिंब, संत्रा, द्राक्ष या फळपिकांचे मोठे नुकसान आहे. टरबूज, कलिंगड, काकडी, पपईसह भाजीपाला पिके पाण्याखाली गेल्याने कुजण्याचा धोका आहे..२९ जिल्हे बाधितनाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, पुणे, जालना, धाराशीव, अकोला, अमरावती, नांदेड, बीड, नंदुरबार, लातूर, भंडारा, गडचिरोली, सातारा, ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, रत्नागिरी, नागपूर, गोंदिया, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पूर्वमोसमी पावसाचा फटका बसला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.