Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील २९ साखर कारखान्यांकडे १५ जानेवारीपर्यंतची सुमारे ६४२ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. विशेष म्हणजे, शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतरही कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसार ही थकित रक्कम एक हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे..जिल्ह्यात यंदा ३४ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. मात्र, त्यापैकी केवळ पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर व करकंब) आणि श्री शंकर या पाच कारखान्यांनीच बेसिक रिकव्हरीप्रमाणे एफआरपी अदा केली आहे..Sugarcane Season: यंदाचा ऊस हंगाम कारखानदारांसाठी ‘टी-२०’.उर्वरित २९ कारखाने एफआरपी देण्यातही अपयशी ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी जाहीर केलेला वाढीव पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. साखर कारखान्यांनी कागदोपत्री २८०० ते ३०२५ रुपयांपर्यंतचा पहिला हप्ता जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात साखर आयुक्तालयाला सादर केली जाणारी आकडेवारी आणि बँकेत जमा होणारी रक्कम यात तफावत असल्याचे बोलले जात आहे. अनेक कारखान्यांकडे डिसेंबरच्यापहिल्या पंधरवड्यातील बिले अद्याप प्रलंबित आहेत..सध्या आचारसंहितेमुळे आंदोलनावर मर्यादा येत आहेत. मात्र, ७ फेब्रुवारीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल. वेळ पडल्यास कारखान्यांच्या गोदामामधील साखर जप्त करून, तिचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.