Water Supply Tankers: अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली असून चिखलदरा तालुक्यातील आठ गावांना २० टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईची तीव्रता येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे..एप्रिलमध्ये तापमानवाढीसोबतच पाणीटंचाईची तीव्रतासुद्धा वाढली आहे. चिखलदरा तालुक्यातील २५० पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाई भेडसावत असून टॅंकरची गावे वाढत चालली आहेत. विशेष म्हणजे, या आठवड्यात पुन्हा काही गावांना टॅंकर लागण्याची शक्यता आहे. शिवाय खासगी विहिरींचे अधिग्रहणसुद्धा होणार आहे..Nanded Water Scarcity: नांदेडला टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा.यंदा मार्च महिन्यापासूनच टॅंकर सुरू झाले. एप्रिलच्या मध्यावर आठ गावांत २० टॅंकर लागले आहेत, तर दररोज विहिरींचे अधिग्रहण होत आहे. येत्या आठवड्यात टॅंकरवर अवलंबिणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी चिखलदरा तालुक्यातील १९ गावांना जुलै व ऑगस्टपर्यंत टॅंकर सुरू होते. यंदासुद्धा अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे..Water Scarcity Management: पाणीटंचाई व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज.उपाययोजनाच नाहीतमेळघाटात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पाणीटंचाईची धग कायम आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने दर उन्हाळ्यात हीच स्थिती कायम आहे..गावात लागले टॅंकरमोथा ः तीन, खडीमल ः सहा, गौलखेडा बाजार ः दोन, बहाद्दरपूर ः एक, आकी ः एक, मेहरियम ः दोन, आलाडोह (शहापूर) ः दोन, आलाडोह ः दोन, गवळीढाणा ः एक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.