Kolhapur News: पंचगंगा नदीला आलेल्या पूर व अतिवृष्टीमुळे इचलकरंजी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नदीकाठच्या गावांतील पिकांसह शेतीमालाचे झालेल्या नुकसानीची महसूल विभागाने तत्काळ पाहणी करून ३४४ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केले. शासनाकडून या पात्र लाभार्थ्यांसाठी २० लाख १७ हजार ८३० रुपये मदत मंजूर केली आहे. मात्र यापैकी १६ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने ७७ हजार रुपयांचे अनुदान प्रतीक्षेत आहे..संबंधित तलाठी कार्यालयाद्वारे या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम करण्यात येत असून लवकरच उर्वरित लाभार्थ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावर्षी पंचगंगेला मोठा पूर नसला तरी नदीकाठच्या घरे व शेतजमिनींचे नुकसान झाले. त्यासाठी जलदगतीने पंचनामे करण्यासाठी पथके नेमण्यात आली..Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत.त्यानुसार पंचनामे ही वेळेत पूर्ण झाले .मात्र घरामध्ये पुराचे पाणी आलेले इचलकरंजी शहरातील ६३, तर इंगळी येथील २२ अशा एकूण ८५ पात्र पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा आहे. शेतीमध्ये पुराचे पाणी आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे..Farmer Compensation : कोल्हापुरात बाधित शेतकऱ्यांसाठी १८ कोटी ३० लाखांचे अनुदान मंजूर.इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील पुराच्या पाण्यात १५३ हेक्टर २६ आर इतकी शेती पाण्याखाली गेली होती. झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रशासनाने ३२८ शेतकऱ्यांना एकूण १९ लाख ४० हजार रुपये इतकी मदत वितरित केली आहे. उर्वरित १६ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण होताच त्यांनाही तातडीने मदत वितरित करण्यात येणार आहे..महसूल विभागाकडून पंचनामे, पडताळणी व मंजुरीची प्रक्रिया वेगाने मार्गी लावली. पुरामुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतीतील गाळ, मातीचे झालेले हालचाली यांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानाचे मूल्यांकन केले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी फाईल प्रक्रिया व निधी वाटप जलदगतीने झाल्याचेही सांगण्यात येत आहे..सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षाघरामध्ये पुराचे पाणी शिरलेल्या इचलकरंजी शहरातील ६३, तर इंगळी येथील २२ अशा एकूण ८५ पात्र पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा आहे. शेतीमध्ये पुराचे पाणी आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील पुराच्या पाण्यात १५३ हेक्टर २६ आर इतकी शेती पाण्याखाली गेली होती. झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रशासनाने ३२८ शेतकऱ्यांना एकूण १९ लाख ४० हजार रुपये इतकी मदत वितरित केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.