Krushi Sanjeevani Benefits : बदलत्या हवामानाला तोंड देत शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने आणि कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २.० सुरू केली आहे. ज्यामध्ये राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश असून जालना जिल्ह्यातील एकूण १७६ गावांची निवड केलेली आहे..जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी उपसंचालक एस. एच. कायंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांची प्रमुख उपस्थिती होती..Krushi Sanjeevani Project: कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन, पाणी ताळेबंद अपूर्ण.जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, की ग्राम विकासासाठी शेतीचा विकास महत्त्वाचा ठरणारा आहे. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २.० समाविष्ट गावातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना या योजनेची माहिती होण्यासाठी ग्रामस्तरावर जनजागृती करण्यात यावी. गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात येत आहे..त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात प्रकल्पात समावेश असलेल्या गावातील समितीमधील पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना वेळेत प्रशिक्षित करावे, असे सांगून शेतीविषयक कामे करताना अपघात होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेत त्रुटींची पुर्तता करून नियमानुसार संबंधितास लाभ देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले..Krushi Sanjeevani Project: कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन, पाणी ताळेबंद अपूर्ण.ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी गावनिहाय शिबिर घ्या : मित्तलजालना : ज्या शेतकऱ्यांची अद्यापही ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करून १० दिवसांच्या आत नोंदणी पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना अंमलात आली आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. .जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, की शेतीच्या आधुनिकीकरणासाठी व शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी ॲग्रीस्टॅक योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी होऊन फार्मर आयडी मिळाला तरच पीएम किसान योजनेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी हितासाठी व कल्याणासाठी शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकरी हिताची कामे कृषी विभागाने कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने करणे गरजेचे आहे..ॲग्रीस्टॅक योजनेचे काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे काम नाही, वेतन नाही ही पध्दत अवलंबिण्यात यावी. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण करणे गरजेचे आहे, त्यामुळे ७ जानेवारी २०२६ पर्यंत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर बँक खात्याला आधार जोडणीची कामे करून प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी मदत करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.