PMFBY Maharashtra : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्यास शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राज्य सरकारने मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. जुलैअखेर जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ३२८ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे..गतवर्षी राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद करून सुधारित पीकविमा योजना लागू केली. तसेच, महत्त्वाचे ट्रिगर वगळून केवळ उत्पादनावर आधारित भरपाई देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, गतवर्षापासून पीकविम्यास मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. यंदा पीकविमा अर्ज भरताना केंद्र सरकारने पीककर्ज नसल्याचे हमीपत्र बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला..Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा योजनेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री भरणे : वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन.विमा अर्ज भरल्यानंतर पीककर्ज घेतल्यास अर्ज रद्द होईल, या भीतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरणे टाळल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने कोणत्याही शेतकऱ्याचा विमा अर्ज रद्द होणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रतिसाद मर्यादितच राहिला आहे. .Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेतील सहभाग निम्म्यावर.खरीपासाठी पीकविमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. या कालावधीत १ लाख ५८ हजार ३२८ शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला असून, त्यात ३ हजार ९४८ कर्जदार व १ लाख ५४ हजार ३८० बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे..पीकविमा नोंदणीची सद्यस्थितीकर्जदार शेतकरी : ३,९४८ बिगर कर्जदार शेतकरी : १,५४,३८० विमा क्षेत्र : १,१३,७४९.९ हेक्टर शेतकरी हिस्सा : ११,३४,१५,८५७ रुपयेदोन वर्षांतील पीकविमा नोंदणी२०२४ : ७,३८,१८३ शेतकरी २०२५ : ३,३०,७८६ शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.