Aslam Abdul Shanedivan
अलीकडच्या काळात अपुऱ्या व अनियमित पावसामुळे पाणीटंचाईसह अन्नधान्याचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे
तर २०५० पर्यंत तीव्र पाणीटंचाईमुळे निम्म्या जगाचे अन्न उत्पादन घटू शकते, जीडीपीत आठ टक्क्यांची घट होऊ शकते, असा अहवाल आला आहे. ज्यामुळे अख्या जगाची चिंता वाढली आहे.
तर हा अहवाल ‘ग्लोबल कमिशन ऑन द इकॉनॉमिक्स ऑफ वॉटर’ या आंतरराष्ट्रीय नेते आणि तज्ज्ञांचा समावेश असलेल्या गटाने दिला आहे.
कमकुवत आर्थिक यंत्रणा, जमिनीचा विनाशकारी वापर आणि जलस्त्रोतांसह हवामान बदलामुळे जागतिक जल चक्रावर अभूतपूर्व ताण आला आहे.
जगातील तीन अब्ज लोक आज पाणीटंचाईला तोंड देत असून अनेक शहरांची भूजल पातळी घटत आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे.
डेटा सेंटर व कोळशावर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांमुळेही पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे.
जल व्यवस्थापनाच्या सध्याच्या दृष्टिकोनात केवळ नद्या, तलावांसारख्या मोठ्या दृश्य जलस्रोतांवरच लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.
पावसाचा पॅटर्न स्थिर ठेवण्यासाठी जमीन व वनस्पतींमधील आर्द्रतायुक्त पाण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.