Aslam Abdul Shanedivan
अनेकदा जंगलात या ना त्या कारणाने किंवा वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी आग लावली जाते.
या लावलेल्या आगीचे रूपांतर कधी कधी वणव्यात होते आणि वनसंपदेची लूट होण्याबरोबरच अनेक जीव जंतू धोक्यात येतात.
तर ९९ टक्के वणवे हे मानवनिर्मित असतात. यामुळे परिपक्क झालेला ‘रानमेवा’ वणव्यांमुळे नष्ट होतो, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
वन संपदा आणि वन्य जीव वाचविण्यासाठी वन विभागाने बक्षीस योजना आखली आहे. ज्यात वणवा लावणाऱ्या किंवा शिकार करणाऱ्यांची माहिती दिल्यास बक्षीस मिळणार आहे
याबरोबरच वन विभागाकडून वना शेजारील गावे तसेच जंगल सफारीवर येणाऱ्या पर्यटकांचे वेळोवेळी समुपदेशन करण्यात येते
यात जंगलात आग लावल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपये दंड होऊ शकतो हे सांगण्यात येते.
तसेच वणवा आणि शिकारींबाबत १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वेळोवेळी वन विभागाकडून केले जाते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.