Swarali Pawar
जोरदार पावसानंतर शेतात पाणी साचल्यास उसाच्या वाढीवर परिणाम होतो. वेळीच योग्य उपाय केल्यास किडी, रोग आणि उत्पादनातील नुकसान टाळता येते.
शेतात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढा आणि चर तयार करा. यामुळे मुळांना हवा मिळून उसाची वाढ पुन्हा सुरळीत होते.
पाणी साचल्यामुळे मुळांना ऑक्सिजन कमी मिळतो आणि अन्नद्रव्यांचे शोषण घटते. त्यामुळे नत्र, लोह आणि गंधकाची कमतरता होऊन पानं पिवळी पडतात.
वाळलेली आणि कुजलेली पानं काढून शेतात हवा खेळती ठेवा. त्यानंतर शिफारशीनुसार नत्र, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करा.
डीएपी, युरिया आणि पालाश यांची शिफारशीनुसार फवारणी करा. यामुळे पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.
नत्र स्थिर करणारे आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण सुधारून पिकाची वाढ चांगली होते.
दमट हवामानात तांबेरा, पोक्का बोईंग, तपकिरी ठिपके आणि मुळकुज वाढू शकते. लक्षणे दिसताच शिफारशीनुसार मॅन्कोझेबची फवारणी करा.
कांडीकीड आणि खोडकीडीचा प्रादुर्भाव नियमित तपासत राहा. शिफारशीनुसार क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोलची फवारणी करून उसाचे संरक्षण करा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.