Aslam Abdul Shanedivan
पिकाच्या जोमदार वाढीसह भरपूर उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर गरजेचा असतो.
रासायनिक खतांचा मर्यादा आणि सेंद्रिय खतांचे फायदे पाहता संतुलित वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
गवत, पाला पाचोळा, जवारी, मक्याची धसकटे, जनावरांचे मलमूत्र, गव्हाचे व साळीचे काडांसह उसाच्या पाचटात सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात
यामुळे आपल्या शेतातील उसाचे पाचट जाळून न टाकता. जमिनीवर टाकल्यास कंपोस्ट खताबरोबरच जमिनीत पुरेसा ओलावा राहण्यास मदत होते.
शेतातील पिकाला वेगळे खत देण्यापेक्षा उसाचे पाचट टाकल्यास हेक्टरी चार ते पाच टन सेंद्रिय खत तयार होते.
पाचट आच्छादनासारखे काम करते. यामुळे तणांची वाढ होत नाही. तर पाण्याची बचत होते.
द्राक्ष बागेत एप्रिलच्या छाटणीनंतर पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केल्यास पाण्याच्या बचतीबरोबरच फळधारण्याचे प्रमाण वाढते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.