Aslam Abdul Shanedivan
पिकांच्या वाढीसाठी माती आणि पाणी जेवढे महत्वाचे असते तेवढेच महत्वाचे खते आणि चांगील बी-बियाणे
मात्र फक्त बी-बियाणे किंवा माती चांगली असून चालत नाही तर पिकाच्या वाढीसाठी जिवाणू संवर्धक ही महत्वाचे असते.
माती, शेणखत, गांडूळ खतात मिसळून जिवाणू संवर्धक तयार करता येते
हे जिवाणू संवर्धक ऊस, बटाटा, हळद, आले इत्यादी पिकांसाठी उपयुक्त ठरते. जे ठिबक सिंचनाद्वारे देता येते
प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये १० किलो बियाणे घेऊन त्यावर १०० मिलि जिवाणू संवर्धक शिंपडावे. तसेच ते मिक्स करताना बियाणे खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी
सोयाबीन, भुईमुगाच्या १० किलो बियाण्यास ५० मिलि जिवाणू संवर्धक वापरावे.
माती, शेणखत, गांडूळ खताचे जिवाणू संवर्धक करण्यासाठी ४०० ते ६०० किलो ओलसर माती, शेणखत किंवा गांडूळ खत वापरून एक लिटर जिवाणू संवर्धक मिसळून रात्रभर ठेवावे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.