Swarali Pawar
खतांचे दर आणि उपलब्धतेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय. पण योग्य नियोजन केल्यास कमी खतांतही चांगले उत्पादन मिळू शकते.
पेरणीपूर्वी बियाण्यांवर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे पिकांना नैसर्गिकरित्या नत्र मिळून खतांची बचत होते.
अझाटोबॅक्टर, रायझोबियमसारखे जिवाणू हवेतले नत्र स्थिर करतात. यामुळे नत्रयुक्त खतांचा वापर २० ते २५ टक्क्यांनी कमी होतो.
शेणखत, गांडूळ खत आणि कंपोस्ट मातीची सुपीकता वाढवतात. यामुळे माती भुसभुशीत राहते आणि ओलावा टिकून राहतो.
माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन करणे फायदेशीर ठरते. यामुळे गरजेपुरतेच खत वापरून खर्च कमी करता येतो.
फक्त युरियावर भर न देता स्फुरद आणि पालाशही द्यावे. संतुलित खतांमुळे कमी खतांतही चांगले उत्पादन मिळते.
ठिबक सिंचनातून दिलेली खते थेट मुळांपर्यंत पोहोचतात. यामुळे खतांचा अपव्यय कमी होऊन कार्यक्षमता वाढते.
बीजप्रक्रिया, सेंद्रिय खते आणि ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहते आणि खर्चही कमी होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.