संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा, काजू नुकसानीची शक्यता 

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सह्याद्री पट्टयातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे अगोदरच ‘कोरोना’मुळे संकटांत सापडलेल्या आंबा, काजूचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.   

जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. उष्मा देखील वाढला होता. बुधवारी दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. वाऱ्याचा वेग देखील वाढला होता. सायकांळी उशीरा विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे-शिराळे, कुर्ली, खांबाळे या भागात चांगला तर इतर तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, घोणसरी, हरकुळे या भागात पाऊस झाला. याशिवाय देवगड, कुडाळ या तालुक्यांमध्ये पाऊस बरसला. अगोदरच ‘कोरोना’मुळे अडचणीत असलेल्या आंबा,काजूचे आता पावसामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT