कोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या शक्यतेमुळे साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जास्तीत जास्त कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) च्या वतीने कारखानदारांत जागृती करण्यात येत आहे. यंदा राज्यात बी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉल निर्मिती करुन साखरेचे उत्पादन दहा लाख टनांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ‘विस्मा’चे आहे. यासाठी उपाययोजनाही सुचविल्या आहेत. याबाबतचे सविस्तर विवेचन राज्यातील प्रत्येक कारखान्याला पाठविले आहे.
गेल्या पंधरवड्यात ‘विस्मा’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत एका बैठकीत याबाबतचे मुद्दे मांडले. मंत्री गडकरी यांनी इथेनॉल तयार होईल तेवढे खरेदी करण्याचे आश्वासन दिले. तसेच एफआरपी, साखरेचे मूल्य, व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलचे दर याचा अभ्यास करुन इथेनॉलला दर चांगला देण्याची ग्वाही दिली. या सर्व सकारात्मक प्रयत्नांमुळे इथेनॉल निर्मिती फायदेशीर ठरेल असा विश्वास ‘विस्मा’ला आहे. असे होऊ शकते इथेनॉल उत्पादन
गोदावरी शुगर रिफायनरी व सोमय्या ग्रुपची दिशादर्शक पद्धती
प्रतिक्रिया गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शंभर टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. जादा साखर निर्मितीमुळे कारखानदारी अडचणीत येऊ शकते. यामुळे इथेनॉल निर्मिती हा चांगला पर्याय कारखानदारांपुढे आहे. साखरेचे उत्पादन फक्त खपाइतकेच करावे लागेल. उर्वरित वापर हा शंभर टक्के इथेनॉल, इतर केमिकल्स, बायो सिएनजी यासाठी केल्यास साखर उद्योग स्वावलंबी बनेल - बी.बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.