संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना साले, लावारीस म्हणणाऱ्यांना शरम वाटत नाही का : शरद पवार

टीम अॅग्रोवन

तासगाव, जि. सांगली  ः शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्यांच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर केली. नेहमी टोकाची टीका टाळणाऱ्या श्री. पवार यांनी भाजपवर कठोर शब्दांचे आसूड ओढले. 

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. १२) सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पवार बोलत होते. आमदार विश्‍वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, सुमन पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदी या वेळी उपस्थित होते. 

श्री पवार म्हणाले, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांचा उल्लेख साले असा करतात, तर त्यांचे वाघ नामक प्रवक्ते शेतकऱ्यांच्या मुलांचा लावारीस असा उल्लेख करतात. सत्तेच्या माजाची ही लक्षणे आहेत. या निवडणुकीत तो माज उतरवा. यांनी  पाच वर्षात सांगितलेले काय केले हे दाखवा. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असे म्हणणाऱ्या मोदी यांच्या काळात राफेल विमानांची किंमत साडेसहाशे कोटींवरून सोळाशे साठ कोटींवर गेली. शाळेत कागदी विमान बनवण्याचा अनुभव असलेल्या अनिल अंबानींना त्यांनी राफेलच्या देखभाल दुरुस्तीचा चाळीस हजार कोटींचा ठेका दिला. त्यासाठी त्यांची सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यापर्यंत मजल गेली. पठाणकोठ आणि पुलवामा हल्ले हे त्यांच्या अक्षम्य ढिलाईची स्मारके आहेत. यांच्या हाती देश सुरक्षित नाही. 

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, की पूर्वी आम्ही आंदोलने केली तर त्याची दखल घेतली जायची. काही ना काही मार्ग निघायचा. आता मात्र आंदोलने केली तर फक्त आश्‍वासने दिली जातात. साडेचार वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले याचा हिशेब मुख्यमंत्र्यांसह भाजप-शिवसेनेच्या कोणाही मंत्र्याने द्यावा. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचो, टोकाचा विरोध केला. भांडणे व्हायची. सरकारमधील मंत्री आंदोलनावर चर्चेला बोलवायचे.

श्री. पवार यांच्या माध्यमातून केंद्रात पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मिळायची. त्या प्रश्नावर काही ना काही निर्णय व्हायचा. पण मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकात पाटील यांनी सांगावे की गेल्या चार वर्षांत दिल्लीतून शेतकऱ्यांचा कोणता प्रश्न सोडवून आणला? दिल्लीत मोदींसमोर तोंड उघडायचे यांना धाडस नाही. शेतकऱ्यांसाठी मी भांडलो आणि यापुढेही भांडत राहणार. सत्ता कोणाचीही असो माझी बांधिलकी शेतकऱ्यांसाठी आहे. सत्तेशी नाही, असे श्री. शेट्टी यावेळी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT