रब्बीसाठी गिरणातून तीन आवर्तनांची शेतकऱ्यांची मागणी
रब्बीसाठी गिरणातून तीन आवर्तनांची शेतकऱ्यांची मागणी 
मुख्य बातम्या

रब्बीसाठी गिरणातून तीन आवर्तनांची शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : गिरणा नदीवरील गिरणा धरणात यंदा ५० टक्केही जलसाठा नाही. यंदा फक्त ६८ टक्के पाऊस झाला. गिरणा नदीचे पाणी नाशिक जिल्ह्यातील नंदगाव, मालेगाव आदी तालुक्‍यांना का देता? या धरणातून तीन आवर्तने रब्बी हंगामासाठी मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबरोबरच नाशिकला पाणी देण्यास आमदार किशोर पाटील, स्मिता वाघ व शिरीष चौधरी यांनीही विरोध केल्याची माहिती मिळाली.  

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्‍यात आहे. परंतु ते चाळीसगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. ते जळगाव जिल्ह्यासाठी बांधले आहे. जिल्ह्यातील २१ हजार हेक्‍टर जमिनीला या धरणाचा लाभ होतो. परंतु यंदा त्यात जलसाठा कमी आहे. मागील वर्षी ७० टक्के जलसाठा होता.

यंदा रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची मदार आहे. कारण खरिपात फटका बसला. या एकमेव धरणाचा लाभ जिल्ह्यातील पश्‍चिम भागाला होतो. इतर प्रकल्प नाहीत. जे प्रकल्प आहेत, त्यात जलसाठाच नाही. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा व एरंडोलातील बहुळा, मन्याड, अंजनी, बोरी, भोकरबारी हे प्रकल्प कोरडेच आहेत. हिवरा व अग्नावती प्रकल्पात तेवढा किरकोळ साठा आहे. यामुळे गिरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाचोरा, भडगाव, पारोळापर्यंत पाणी आवश्‍यक असेल.

रब्बीसाठी भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, धरणगाव एरंडोल तालुक्‍याला गिरणा धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले जाते. त्यासंबंधी अजून पाणी आरक्षण निश्‍चित झालेले नाही. त्याबाबत जलसंपदा विभागाची बैठक तातडीने घेतली जावी. नाशिक जिल्ह्यास पाणी अधिक न देता ते जळगाव जिल्ह्याला दिले जावे. रब्बीसाठी तीन आवर्तने दिली जावीत. पिण्याच्या पाण्यासाठीदेखील स्वतंत्र आवर्तने दिली जावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT