vegetabel
vegetabel  
मुख्य बातम्या

भाजीपाला पिकावर फिरवला नांगर 

टीम अॅग्रोवन

नगरसूल, जि. नाशिक : आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चही निघत नसल्याने येवला तालुक्यातील कुसमाडी येथील साठे बंधूंनी शेतातील मेथी व कोथिंबीर पिकावर नांगर फिरविला. चालू वर्षी अतिवृष्टीमुळे कांदा, मका, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कांदा लागवडीसाठी रोपे उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक पालेभाज्यांची लागवड केली. मात्र सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्च तर दूरच, केवळ वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्यामुळे प्रभाकर साठे व अशोक साठे या शेतकरी बंधूंनी पिकविलेल्या मेथी व कोथिंबिरीच्या जोमदार पिकांवर जड अंतःकरणाने नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. येथील प्रभाकर साठे यांनी १०० रुपये किलो दराने ७५ किलो मेथी बियाणे विकत आणून एक एकरात मेथीचे पीक घेतले. मशागत, खत, पाणी व मेहनतीने जोमदार पीक तयार केले. मात्र बाजारात सध्या भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे जड अंतःकरणाने उभ्या मेथीच्या पिकावर नांगर फिरविला आहे. त्यांचे बंधू अशोक साठे यांनी कोथिंबीर लागवड केली. मात्र त्यांचीही तीच गत झाल्याने कोथिंबीर पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली. कोळगाव येथील शेतकरी विजय धनवटे यांनीही मेथी व कोथिंबीर पिकावर नाइलाजाने नांगर फिरविला आहे. प्रतिक्रिया अतिवृष्टीमुळे मका, कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. मेथीच्या पिकाचा हातभार लागेल या आशेने पीक घेतले. पण उत्पादन खर्च दूरच वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. - प्रभाकर साठे, शेतकरी, कुसमाडी, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT