पुण्यात उद्या ठरणार ‘इथेनॉल’चे धोरण
पुण्यात उद्या ठरणार ‘इथेनॉल’चे धोरण 
मुख्य बातम्या

पुण्यात उद्या ठरणार ‘इथेनॉल’चे धोरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण दहावरून वीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावे, यासह एकूणच देशभरातील इथेनॉलचे नव्याने धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘इथेनॉल हे वाहतुकीचे इंधन’ या विषयावर पुण्यात उद्या (शुक्रवारी, ता. २४) परिषद होणार आहे. याचे उद्‌घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) वतीने आयोजित या परिषदेस पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एएनईआरचे केंद्रीय सचिव आनंद कुमार उपस्थित राहतील, अशी माहिती सीआयआरटीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब पाटील आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली. पाटील म्हणाले, ‘‘देशात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने  इंधन साठ्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ८२ टक्के इंधन आयात करावे लागत आहे. सध्या देशात केवळ १८ टक्के इंधन साठा शिल्लक असून, पंधरा वर्षांनंतर देशाला पेट्रोल, डिझेलसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दहा टक्केच इथेनॉलचे मिश्रण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये वीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करणे गरजेचे आहे. तसे केल्यास पैशाचीही बचत होईल.’’ महाराष्ट्रातील ९५ टक्के साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती करण्याची क्षमता आहे. पूर्ण क्षमतेने त्याचा वापर केल्यास वर्षाला ६५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. सध्या केवळ ३० ते ३५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होत असून केंद्र सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.  - राजेंद्र पाटील, संचालक, सीआयआरटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT