soybean
soybean  
मुख्य बातम्या

तेरा बियाणे कंपन्यांवर अखेर फौजदारी गुन्हे 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे पुरवल्याचा ठपका ठेवत अखेर कृषी विभागाने १३ बियाणे कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. यामुळे बियाणे उद्योगात खळबळ उडली आहे. गुन्हे दाखल झालेल्या कंपन्या पुणे, सोलापूर, बीड, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, नागपूर आणि चंद्रपूर भागातील आहेत.  शेतकऱ्यांकडून कृषी विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारींची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. तक्रारींच्या आधारे क्षेत्रीय पाहणीदेखील सुरू आहे. त्यामुळे अजून काही कंपन्यांवर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात सोयाबीनचा पेरा दरवर्षी साधारणतः ४१ लाख हेक्टरवर होतो. चालू खरीप हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात पेरा ४८ टक्क्यांपर्यंत झालेला आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात मोठ्या प्रमाणात बियाणे निकृष्ट निघत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्याने लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाकडे लेखी तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे तपासणी प्रक्रियेत बियाणे सदोष आढळल्याचे निष्पन्न होताच बियाणे कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या कंपन्यांपैकी उत्तराखंड व मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका कंपनीचा समावेश आहे.  गेल्या वर्षी बीजोत्पादन कालावधीत हवामान अनुकूल नसल्याने अडचणी आल्या होत्या. सदोष बियाणे आढळण्यात चांगल्या कंपन्यांचा दोष नाही. कारण खोलवर पेरा होणे, पावसाचा खंड, बियाण्यांची आदळआपट यामुळेदेखील उगवणीला अडचणी येऊ शकतात, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  “क्षेत्रिय परिस्थिती बघता काही ठिकाणी बियाणे कंपन्यांचा सरसकट दोष नसतो. मात्र, शासनाचे आदेश असल्याने गुन्हे दाखल करण्याशिवाय पर्याय नाही,” असेही अधिकारी सांगत आहेत.  तथ्य तपासूनच कारवाई  कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, बियाणे न उगवल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रत्येक तक्रार अर्जाची दखल घेतली जात आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत संबंधित शेतकऱ्याकडे बांधावर जाऊन माहिती घेतली जाते. तक्रारीतील तथ्य तपासूनच अंतिम कारवाई केली जाते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT