कापूस, ज्वारी उत्पादकांसाठी ४८ कोटी प्राप्त
कापूस, ज्वारी उत्पादकांसाठी ४८ कोटी प्राप्त 
मुख्य बातम्या

कापूस, ज्वारी उत्पादकांसाठी ४८ कोटी प्राप्त

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात कापूस, ज्वारी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेल्या ८५ हजार ५७८ पैकी ३० हजार ६६३ शेतकरी विमा संबंधीच्या भरपाईस पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ८५ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे १६ कोटी ३३ लाख ६२४ हजार रुपये भरले होते. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, असे सांगण्यात आले.  ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे, त्याची यादी कृषी विभागाने प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. कारण शेतकरी संभ्रमात आहेत. ज्यांनी विमा संरक्षण घेतले होते, त्यांना अजून कोणताही संदेश संबंधित विमा कंपनी किंवा बॅंकेकडून आलेला नाही. शेतकऱ्यांची वणवण थांबावी किंवा त्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी ग्रामपंचायती व सोसायट्यांमध्येही यादी पाठविण्याची मागणी केली जात आहे. 

निम्मे शेतकरीही पात्र नाहीत ८५ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले. मागील हंगामात तर जिल्ह्यात दुष्काळ पडला. १४ तालुक्‍यांमध्ये स्थिती बिकट होती. मग फक्त निम्मेच शेतकरी कसे भरपाईसाठी पात्र ठरले. इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही का? बोंड अळीने तर जिल्हाभर कहर केला. कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. ही बाब विमा कंपनी, कृषी विभाग आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेऊन भरपाई द्यायला हवी, अशी अपेक्षा शेतकरी भागवत सरोदे (रावेर) यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT