कोरोना उद्रेक : संपूर्ण देशात निर्बंध लागू
कोरोना उद्रेक : संपूर्ण देशात निर्बंध लागू 
मुख्य बातम्या

कोरोना उद्रेक : संपूर्ण देशात ३१ मार्चपर्यंत निर्बंध लागू

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील साऱ्या शाळा, महाविद्यालये, जलतरण तलाव व मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सोमवारी दिले.  शेकडो-हजारोंची गर्दी जमणाऱ्या ठिकाणांपैकी संसद अधिवेशन वगळता बहुतांश सारी ठिकाणे आता कोरोनाच्या धास्तीने बंद झालेली आहेत. कोरोना विषाणूची लागण आत्तापर्यंत १२१ लोकांना झाली असून १३ रूग्ण बरेही झाले आहेत, अशी माहितीही केंद्राने दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी  सायंकाळी सांगितले की ३१ मार्चपर्यंत देशभरातील साऱ्या शाळा-महाविद्यालये, जलतरण तलाव, मॉल आदी बंद ठेवण्यात येणार असून सर्व राज्यांना त्याबाबतची मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे. अनेक राज्य सरकारे, संस्था व कंपन्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा कमीतकमी उपयोग लोकांनी करावा यासाठी घरूनच कामकाज करण्याची मुभा दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT