अजित नवले
अजित नवले 
मुख्य बातम्या

मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवले

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५ नोव्हेंबरला मुंबईत परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजप वगळता इतर सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे ठरवून २८ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीला मोदी सरकारला घेरण्यासाठी कूच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सेक्रेटरी डॉ. अजित नवले यांनी दिली. किसान सभेच्या वतीने येथे राज्यभरातील कार्यकर्त्यांचे दोनदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन सोमवारी (ता. २२) झाले त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय किसान सभेचे राष्टीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नवले म्हणाले, की किसान सभेने लाॅँग मार्चच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांनी सरकारवर दबाव टाकून शेतकरी प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही. दुष्काळ, विविध पिकांचे हमीभाव, हमीभाव केंद्रांची मागणी आदींसाठी आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे. यासाठीचे नियोजन या दोनदिवसीय बैठकीत होणार आहे. आमच्याबरोबर अनेक संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नावर आंदोलन करतात. आंदोलन तीव्र करतात. पण ऐन निर्णयाच्या वेळी कचखावू निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करतात. आम्ही तसे होऊ देणार नाही. आमची संघटना व्यक्ती केंद्रीत नाही. आम्ही धोरणासाठी लढणारे लोक आहोत. संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाला किफायतशीर दाम मिळविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू. डॉ. ढवळे म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत शेतकऱ्याला खूप वाईट दिवस आले. इतर सरकारांनी थोड्या थोड्या प्रमाणात तरी कर्जमाफी केली. परंतु मोदी सरकारने कर्जमाफी तर केली नाहीच. या उलट अनेक बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली. हे सरकार आता बाजूला काढण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. दुष्काळ, भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन देण्याबाबतचा लढा तीव्र करण्यत येर्इल. या वेळी श्री गावीत, डॉ. उदय नारकर, श्री पवार पाटील, किसन गुजर, अर्जुन आडे यांची भाषणे झाली. सुभाष निकम यांनी प्रास्ताविक केले. संभाजी यादव यांनी आभार मानले.

शेतकरी संघटनांवर टीकेची झोड डॉ. नवले यांनी शेतकरी संघटनांच्या कचखावू वृत्तीवर टीकेची झोड उठविली. खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भूमिकांविषयी नाराजी व्यक्त केली. स्वत:ची पदे टिकविण्यासाठी काही जण एमआयएमसारख्या पक्षांशी हातमिळविणी करीत आहेत. तर काही जण मंत्रिपदे घेऊन सरकारचे गोडवे गात आहेत. अशा भूमिकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉ. नवले यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT