सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव पवार यांनी उपस्थितांना मार्गदशर्न केले.
सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव पवार यांनी उपस्थितांना मार्गदशर्न केले. 
मुख्य बातम्या

शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा : प्रतापराव पवार

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत याचा विचार करावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू नये, असे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे केले.

सकाळ-अॅग्रोवनच्या स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की लोकांच्या साहाय्याने लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी काम करायचे ही दैनिक ‘सकाळ’ची परंपरा आहे. व्यवस्थेत शेतकरी हा मोठा वर्ग आहे. हे जाणून ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी जेव्हा अॅग्रोवनची संकल्पना मांडली तेव्हा सुरवातीला काहींनी हा वेडेपणा ठरवला. शेतकरी वाचत नाही, तेव्हा कुठे हे वृत्तपत्र चालणार, अशी चर्चा झाली. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःच हा गैरसमज खोटा ठरवला आहे. ‘सकाळ’ने राज्यातील दुष्काळी भागात पाण्याबाबत सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सुमारे ५०० गावे टंचाईमुक्त करण्यात यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. कोट्यवधींची उलाढाल शक्य झाली. ते पुढे म्हणाले, महिलांची मोठी शक्ती नजरेसमोर ठेवून महिलांसाठी तनिष्का हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आत्महत्या करतात, याची खंत व्यक्त करताना त्यांनी महिला मात्र जिद्दीने उभी राहते, ती कधीही आत्महत्या करीत नाही, ती संकटाचा धाडसाने मुकाबला करते, असे सांगत महिलांमध्ये असे अलौकिक सामर्थ्य असते, याचा उल्लेख केला. हे सांगत असताना त्यांनी अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार मिळालेल्या ज्योतीताई देशमुख यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात काम करायची इच्छा निर्माण व्हावी त्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगून चांगलं घडतंय, घडू शकतंय हे सांगायचा उद्देश त्यामागे असल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, नाशिकच्या सह्याद्री अॅग्रो फूड्ससारख्या संस्था उभाराव्यात, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत याचा विचार व्हावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू असे प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आगामी काळातही शेतकऱ्याला आणखी काही नवीन देता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे मिळावं यासाठीसुद्धा सकाळ प्रयत्नशील असल्याचे सांगताना पुढील वर्षी याबाबत विस्ताराने बोलेन, असेही श्री. पवार म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT