पाणीटंचाई
पाणीटंचाई  
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील ८३ गावांची तहान टॅंकरवर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसताहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातही टंचाईची झळ बसणे सुरू झाली असून नांदेड जिल्ह्यातील काही गावांनाही टंचाई सामना करावा लागत असल्याची माहिती आहे. औरंगाबाद व जालना मिळून ८३ गावांची तहान टॅंकरवर भागविण्याची वेळ आली आहे.  गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीच्या मध्यान्हात ४८ गावांत बसलेली पाणीटंचाईची झळ बसली होती. यंदा फेब्रुवारीच्या सुरवातीलाच ७८ गावांपर्यंत पोचलेली टंचाईग्रस्त गावांची संख्या टंचाईची तीव्रता स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. गतवर्षी वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, खुल्ताबाद आदी गावांना टंचाईची तिव्रता जाणवत होती. यंदा औरंगाबाद, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, खुल्ताबाद आदी तालुक्‍यांतील गावांमधील गावांना टंचाईची झळ बसते आहे. त्यामध्ये गंगापूर तालुक्‍याला टंचाईची सर्वाधिक झळ बसते आहे. गंगापूर तालुक्‍यातील ४२ गावे पाणीटंचाईचा सामना करीत असून फुलंब्री तालुक्‍यातील २० गावांनाही टंचाईची झळ बसते आहे.  औरंगाबाद तालुक्‍यातील ३, वैजापूर तालुक्‍यातील ४, खुल्ताबाद तालुक्‍यातील ४, कन्नड तालुक्‍यातील २, सिल्लोड तालुक्‍यातील ३ गावांचा टंचाईग्रस्त गावांमध्ये समावेश आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातील ३ व जाफ्राबाद तालुक्‍यातील २ मिळून पाच गावातील ६८८९ लोकांची तहान टॅंकरवर भागविण्याची वेळ आली आहे. गत पावसाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यात विविध भागात पावसाचा प्रदीर्घ खंड पडला होता. सोबतच परतीच्या पावसाची हजेरीही काही भागातच बरी होती. नांदेड जिल्ह्यातही काही गावांना टंचाईची झळ बसणे सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

९६ टॅंकर भागवताहेत तहान औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी ९६ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठी ८९ तर जालना जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठीच्या ७ टॅंकरचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधीक ४५ टॅंकर गंगापूर तालुक्‍यात सुरू असून फुलंब्री तालुक्‍यात २८ टॅंकर लोकांची तहान भागविण्यासाठी फेऱ्या मारत असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.  ११६ विहिरींचे अधिग्रहण औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी आजवर ११६ विहिरींचे अधिग्रहनण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १११ व जालना जिल्ह्यातील ५ विहिरींचा यामध्ये समावेश आहे. फुलंब्री तालुक्‍यात सर्वाधिक ४०, गंगापूर व कन्नड तालुक्‍यांतील प्रत्येकी २२, सिल्लोड तालुक्‍यातील १०, वैजापूर व खुल्ताबाद तालुक्‍यातील प्रत्येकी ७ तर औरंगाबाद तालुक्‍यातील ३ विहिरींचा यामध्ये समावेश आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्‍यातील ३ व जाफ्राबाद तालुक्‍यात २ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT