Onion Agrowo
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा निर्यातीला अंशतः परवानगी दिल्याचा दराला फायदा झाला का?

Anil Jadhao 

Market Bulletin : केंद्र सरकारने ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर आज देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव क्विंटलागं १०० ते २०० रुपयांनी वाढले होते. सरकारने चार देशांना ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात करण्याला परवनगी दिली.

बाजारातील कांदा आवक दुसरीकडे टिकून आहे. पण निर्यातीला अंशतः परवानगी दिल्याचा फायदा कांदा भावाला मिळत आहे. कांद्याच्या भावातील ही वाढ टिकून राहण्याचा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे. कापसाच्या भावातील वाढ टिकल्याने पुढील काळात का ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कापूस बाजारातील आवक मात्र घटली आहे. कापसाची आवक गुरुवारी १ लाख १२ हजार गाठींच्या दरम्यान आली होती.

तर कापसाचा भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान पोचला. कापसाला चांगला उठाव मिळत आहे. तर बाजारातील आवकही कमी होत आहे. त्यामुळे ही वाढ कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात निराशेचे वातावरण कायम आहे. याचा परिणाम आपल्याकडेही दिसून येत आहे. देशात सोयाबीनची आवक कायम असून भावही दबावातच आहेत.

सोयाबीनचे भाव आजही क्विंटलला ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. केंद्र सरकार स्वस्त तूर आयातीचा प्रयत्न करत आहे. पण भारताची वाढलेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन निर्यातदार देश स्वस्तात माल द्यायला तयार नाहीत.

त्यामुळे देशात तुरीचे भाव सरासरी ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातील बाजारात आवक कमी आहेच. शिवाय आयातही घटलेली दिसते. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी यापुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात  ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे.

ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT