भाज्यांबरोबर फळेही आरोग्यासाठी उत्तम असतात. सफरचंद, संत्री, मोसंबी या फळांबरोबरच डाळिंब हे उत्कृष्ट फळ मानले गेले आहे. निसर्गाने यात अनेक औषधी गुणधर्म ओतप्रोत भरल्याने उत्तम आरोग्य निर्माण करण्याची क्षमता डाळिंबामध्ये असते.
डाळिंब हे मुळातच पित्तशामक आहे. त्यामुळे आंबट पाणी घशाशी येणे, जळजळणे, चक्कर येणे, उलट्या अशा लक्षणांमध्ये रोज १ डाळिंब जरूर खावे. तहान लागणे, ऊन सहन न होणे, एकदम गळून जाणे या तक्रारींवर डाळिंबाचे दाणे खाल्ल्यास त्वरित फायदा दिसतो. हृदयविकार असणाऱ्यांनीही डाळिंब जरूर खावे. बऱ्याचदा वेळी-अवेळी जेवण झाले, की अजीर्ण होते. अशावेळी पूर्ण लंघन (उपवास) करावे, पण या उपवासात डाळिंब भरपूर खावे. पोळी-भाजी-भात याला सुटी द्यावी.
डाळिंबाच्या रसात जिरेपूड, मीठ घालून घेतल्यासही चांगला उपयोग होतो. लग्नकार्य, घरगुती समारंभ यांत बाहेरचे भरपूर खाणे होते. बाहेरगावी कार्य असेल तर हवाबदल, पाणीबदल होतो. त्यामुळे पोट बिघडते. अशावेळी डाळिंबाच्या फळाची साल, सुंठ पावडर, बडीशेप पाण्यात उकळून ते पाणी ३-४ वेळेला गरम स्वरूपात प्यावे. त्यामुळे पोटदुखी, जुलाब कमी होतात. डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात धरल्याने किंवा साल वाळवून त्याची पावडर मधातून घेतल्याने खोकल्यावरही चांगला परिणाम होतो.
डाळिंब सेवनाचे फायदे
लेखीका पुणे येथे अायुवेर्द तज्ञ अाहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.