उसपिकास पाचट आच्छादन करुन जोडओळ पद्धतीने ठिबकसिंचन करावे.
लागवडीनंतर ६ आठवड्यांनी नत्राचा दुसरा हफ्ता प्रतिहेक्टरी युरिया १०० किलो याप्रमाणात द्यावा.निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.पिकास ८ - १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.सिंचन करताना मोठे वाफे किंवा पाडगे यामध्ये न देता सरळ पद्धतीने द्यावे. कारण त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय न होता उपलब्ध पाण्यात अधिक दिवस सिंचन करणे सोपे जाते.खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी फवारणी करावी. त्यासाठी क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना द्रावण पोंग्यात पडेल याची काळजी घ्यावी.गावाजवळील पांढरीच्या जमिनीत लोहाच्या कमतरतेमुळे पीक पिवळे किंवा पांढरे पडते. अशाठिकाणी ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेटची फवारणी करावी.जमिनीवर लोळू नये म्हणून उसाची मोठी बांधणी वेळेवर करावी.वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकावर पांढरी माशी तसेच लोकरी मावा या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.प्रादुर्भावग्रस्त पाने माशीची अंडी व कोषासहित तोडून जमिनीत पुरून टाकावीत. उसाचे पीक ५ महिन्यांचे होईपर्यंत शेतातील अतिप्रादुर्भावग्रस्त काळे कोष असलेली पानेदेखील काढून टाकावीत.त्यानंतर ॲझाटिरॅक्टीन १०,०००पीपीएम ५ मि.लि.प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. कीडग्रस्त शेतात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे (२० प्रतिहेक्टरी) लावावेत. नत्रयुक्त रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात वापर करावा.नत्र पाने किडीच्या अवस्थेसह काढून बांधावर जाळून टाकावीत.क्लोरपायरीफॉस २ मि.लि. अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. उसाची तोडणी तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत करावी.उसतोडणीनंतर वरंब्याच्या बगला नांगराच्या साह्याने फोडून घ्याव्यात. त्यानंतर पुन्हा सऱ्या पाडाव्यात.उसतोडणीनंतर १५ दिवसांनी हेक्टरी ७५ किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश सरीमध्ये देऊन पाण्याची पाळी द्यावी.उसतोडणीनंतर ४५ दिवसांनी नत्राचा दुसरा हफ्ता हेक्टरी ७५ किलो युरियाद्वारे द्यावा.अगोदर तोडलेल्या उसाचा खोडवा साडेचचार महिन्याचा झाला असल्यास हेक्टरी १०० किलो नत्र युरियाद्वारे देऊन पक्की खांदणी करावी.पाण्याच्या पाळ्या १० दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात.पाण्याची कमतरता असल्यास वाळलेले गवत, उसाचे पाचट इत्यादीचा आच्छादन म्हणून वापर करावा किंवा एक आड एक सरी पाणी द्यावे.काणी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांची बेटे मुळासकट खोदून नष्ट करावीत. संपर्क : डाॅ. यु.एन. आळसे, ७५८८०८२१३७ (कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)