Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Surat-Chennai Greenfield Express Highway : महामार्गबधित शेतकऱ्यांना टोल कंपन्यांचे भागीदार करा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर : महामार्गांमुळे बाधित शेतकरी होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित महामार्गाच्या टोल कंपनीत त्याच्या हिश्शाप्रमाणे पाच ते २५ टक्क्यांची भागीदारी द्यावी. तरच शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्‍न मिटेल, अन्यथा आज मिळणारी एकरकमी भरपाई आयुष्यभर त्यांना भाकरी देऊ शकणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते रघुनाथ कुचिक यांनी केले.

सुरत- चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या भूमिपुत्र परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरसय्या आडम, वैज्ञानिक अरुण देशपांडे, श्रीमती ए. डी. राऊत, ॲड. अनिरुद्ध जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजन महारुद्र जाधव यांनी केले. ॲड. अनिरुद्ध जाधव यांनी भूसंपादन प्रक्रियेतील अनेक बारकावे सांगितले.

श्री. कुचिक म्हणाले, की महामार्गबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे कामगारांना किमान वेतनचा कायदा लागू करण्यात आला आहे, त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या दुधासाठी किमान दर लागू करण्यात यावा. तसेच भूसंपादन प्रक्रियेसाठी ठरावीक दर निश्‍चित करण्यात यावा. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, असेही ते म्हणाले. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले. वृंदावन फाउंडेशनचे सचिन पाटील यांनी आभार मानले. या वेळी ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अरविंद मोटे, धाराशिवचे निसार मुजावर व उपेन्द्र कटके या पत्रकारांसह सुमार चाळीस शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


...तर विधानसभेचे कामकाज बंद पाडू : आडम

चारच महिन्यांवर निवडणुका आल्या आहेत. नव्या विधानसभेत सरकार कोणतेही असू द्या मी तिथे आमदार म्हणून आहेच, यापूर्वी मी श्रमिकांसाठीच लढत आलो आहे. मला निसर्गाने दिलेला आवाज हा शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी विधानसभेत वापरेल. सुरत-चेनई महामार्ग बाधितांना योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही विधानसभेचे कामकाजच होऊ देणार नाही, इशारा नरसय्या आडम यांनी दिला.


रुमणं, संविधान आणि धोतर
या कार्यक्रमाची सुरुवात शेतकऱ्यांचा पेहराव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोतरावर ठेवण्यात आलेले भारतीय संविधान व शेतकऱ्यांच्या अवजार रुमणं यांचे पूजन करून करण्यात आले. यामागील भूमिका स्पष्ट करताना महारुद्र जाधव यांनी सांगितले, की शेतकरी हा संविधानानुसार चालणारा असून, त्याच्या पेहरावातील धोतराप्रमाणे पांढऱ्या शुभ्र चारित्र्याचा असतो. मात्र त्याच्यावर अन्याय झाला तर तो रुमणं उचलल्या शिवाय राहत नाही, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT